महाराष्ट्र नामा: Kalyan News : खड्ड्यात पडला, हातावरून ट्रकचं गेलं चाक, २४ दिवस मृत्यूशी झुंज, स्वातंत्र्यदिनी रोहनची प्राणज्योत मालवली
Kalyan Accident : रस्ते अपघातामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. अशातच कल्याणमधील एक धक्कादाय बातमी समोर आली आहे. खड्ड्यांमुळे एका तरूणाचा बळ गेला आहे. गेले २४ दिवस त्याने मरणाशी झुंज दिली. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र नामा. वृत्तसेवा कल्याण : कल्याणातील २८ वर्षीय तरुणाचा मानपाडा रस्त्यावर खड्ड्यात दुचाकी आदळून २३ ऑगस्ट रोजी भीषण अपघात झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र २४ दिवस त्याला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न डॉक्टराकडून करण्यात आले. मात्र १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.२५ वाजता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या जाण्याने कुटुंबावर आघात कोसळला आहे. रोहन शिंगरे असे या तरुणाचे नाव आहे.
कल्याणच्या रामबाग परिसरात आई वडिलासमवेत राहणारा रोहन वाशी मधील आय सी आय लोम्बार्ड शाखेत काम करत होता. रोहन नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकी वरून २३ जुलै रोजी कामावर जात असताना कल्याण शिळ मार्गावरील पिंपळेश्वर पॉईट हॉटेलजवळच्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने रोहनचा अपघात झाला. दुचाकीवरून रोहन खाली पडताच त्याचा डावा हात मागून येणाऱ्या ट्रक खाली चिरडला गेला. या ट्रकने त्याला काही मीटर अंतरा पर्यत फरपटत नेले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या रोहनला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले घटनेची माहिती मिळताच तातडीने धाव घेत वडील राजेंद्र यांनी इतरांच्या मदतीने रोहनला सानपाडा येथील महात्मा फुले चरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात दाखल केले.
मागील २४ दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. या दरम्यान त्याच्या डाव्या हातात इन्फेक्शन झाल्याने त्याचा डावा हात कापून काढण्यात आला. मात्र तरीही त्यांच्या संपूर्ण शरीरात इन्फेक्शन झाल्याने त्याचे अवयव हळूहळू निकामी होऊ लागले होते. अखेर १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.२५ वाजण्याच्या सुमारास रोहन याने अखेरचा श्वास घेतला. रोहन याच्या मागे आई वडील आणि विवाहित बहिण आहे. कुटुंबाची जबाबदारी शिरावर घेतलेल्या एकुलत्या एका मुलाच्या जाण्याने रोहनच्या आईवडीलावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
रस्त्यावर पडलेले खड्डे वाहन चालकाच्य जीवावर उठलेले असताना कल्याण शिळ मार्गावर सुरु असलेले मेट्रोचे काम त्यातच अवजड वाहनाची वाहतूक आणि तरीही वाहतुकीसाठी ठेवलेली निमुळत्या रस्त्यावर कुठे खड्डे तर कुठे सिमेंट पडल्याने रस्त्याचा ढासळलेला पोत, उंचसखल रस्ते, उखडलेले पेव्हर ब्लॉक यातून वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागतात. दुचाकी चालकांना कामावर पोचण्याची असलेली घाई आणि खड्डेमय त्रासदायक रस्त्याचा जाच यामुळे दुचाकी चालकांना जीवावर उदार होऊनच वाहने चालवावी लागत असून या मार्गावरील मृत्यूचा सापळा हटविण्याची मागणी रामबाग खडक परिसराच्या माजी नगरसेविका वैजयंती घोलप यांनी केली आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















