Homeताज्या बातम्याठाण्यात अर्ज मागे घेणाऱ्या 'त्या' उमेदवारांविरोधात शिवसेना - मनसेची पोलीसांत धाव...

ठाण्यात अर्ज मागे घेणाऱ्या ‘त्या’ उमेदवारांविरोधात शिवसेना – मनसेची पोलीसांत धाव…

ठाण्यात अर्ज मागे घेणाऱ्या ‘त्या’ उमेदवारांविरोधात शिवसेना – मनसेची पोलीसांत धाव…

राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी श्रीनगर पोलिसांना दिले निवेदन…

ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेत शिंदेंच्या साथिदारांना ‘बिनविरोध’ निवडुन येण्यास साह्य करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तिन्ही उमेदवारांसह संबधित पोलीसावर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी शिवसेनेचे राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी श्रीनगर पोलीसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर पोलिसांनी निवडणुक आयोगाकडून अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासित करण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनाही यासंदर्भात अवगत करून तातडीची कारवाई करण्याची विनंती केल्याचेही विचारे व जाधव यांनी सांगितले.
ठाणे महापालिका निवडणुकी दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाग क्रमांक ५ ‘ब’ दादाभाऊ रेपाळे, प्रभाग क्रमांक १८ ‘ब’ च्या स्नेहा नांगरे आणि प्रभाग क्रमांक १८ ‘ड’ चे उमेदवार विक्रांत घाग ह्यांना पक्षातर्फे ‘एबी’ फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी घोषित केली होती. मात्र, तिघांनीही पक्षाला न कळविता परस्पर माघार घेत शिंदेच्या साथीदारांना बिनविरोध निवडून येण्यास मदत केली. ही बाब राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी गांभिर्याने घेतली आहे. या अनुषंगाने रविवारी श्रीनगर पोलीस ठाण्यात या तिघा उमेदवारांविरोधात सेना – मनसेने निवेदन सादर करून तिघांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटल्यानुसार, सत्ताधाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून तसेच, पैशांचे आमिष दाखवून या तिघांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश असुन त्या पोलीसाने विक्रांत घाग या उमेदवाराला एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यात नेले होते. या चित्रिकरणाचे पुरावे सोशल मिडिया तसेच सर्व प्रसार माध्यमांवरही झळकले आहेत. त्यामुळे, ही बाब गंभीर असुन एक प्रकारे पोलीस खात्यालाही लांच्छनास्पद आहे. किंबहुना, परस्पर माघार घेणाऱ्या उमेदवारांनी त्या – त्या प्रभागातील मतदारांशी केलेली ही प्रतारणा आहे. तेव्हा, सत्ताधारी व सरकारी यंत्रणांनी मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून लोकशाहीच संपुष्टात आणली आहे. त्यामुळे निवडणुक अधिकाऱ्यांशी संगनमत करून सत्ताधाऱ्यांनी केलेल्या या गैरप्रकाराबद्दल नागरिकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने संबधित पोलीसासह त्या तिन्ही उमेदवारांवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा, अशा चुकीच्या पायंड्यामुळे लोकशाहीवरील विश्वास उडून नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होईल. असा इशारा राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...
error: Content is protected !!