Homeक्राईमअनधिकृत बांधकाम केल्याचे निष्पन्न झाल्यास निवडून आलेला उमेदवार अपात्र ठरणार

अनधिकृत बांधकाम केल्याचे निष्पन्न झाल्यास निवडून आलेला उमेदवार अपात्र ठरणार

अनधिकृत बांधकाम केल्याचे निष्पन्न झाल्यास निवडून आलेला उमेदवार अपात्र ठरणार?

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेकडून गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू असून आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ठाणे महापालिका
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता “आम्ही अनधिकृत बांधले नाही” याबाबत शपथपत्र लिहून द्यावे लागणार आहे. ‘आम्ही अनधिकृत बांधकाम केलेले नाही आणि निवडूण आल्यावर बांधकाम केल्याचे सिद्ध झाले तर नगरसेवक पदास अपात्र ठरेन, असा उल्लेख उमेदवार आणि कुटुंबातील उमेदवाराला करावा लागणार आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहीली आहेत. आठ ते नऊ मजली इमारती भूमाफियांनी उभारल्या असून त्यावर पालिकेकडून फारशी कारवाई होताना दिसून येत नव्हती. यातील काही बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी देताना न्यायालयाने ही बांधकामे पाडण्याचे आदेश देण्याबरोबरच पालिकेची कानउघडणी केली होती. यानंतर पालिकेने विशेष पथके तयार करून शहरात अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई सुरू केली असून त्याचबरोबर या विभागातील अनेक अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाने इतर विभागात बदल्या केल्या आहेत. असे असले तरी यातील अनेक बांधकामे
राजकीय पाठबळामुळे झाली असल्याची चर्चा होती. आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, ठाणे महापालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता अनधिकृत बांधकामाबाबत शपथपत्र लिहून द्यावे लागणार आहे.
लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर निवडणुका लढविण्यासाठी उमेदवारांना अर्जासोबत एक शपथपत्र द्यावे लागते. त्यात मालमत्तेची माहिती, अपत्य संख्या, खर्चाचा हिशोब विहित पद्धतीने सादर केला नाहीतर अपात्र ठरेन अशी माहिती नोंद करावी लागते. त्यासोबतच आता ‘आम्ही अनधिकृत बांधकाम केलेले नाही आणि
निवडूण आल्यावर बांधकाम केल्याचे सिद्ध झाले तर नगरसेवक पदास अपात्र ठरेन, असा उल्लेख उमेदवार आणि त्यांच्या पत्नीला करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...
error: Content is protected !!