Homeमहत्त्वाचेराज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी काय घडलं

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी काय घडलं

Raj Thackeray : बेस्ट पतपेढी ही स्थानिक निवडणूक, राज ठाकरेंनी विषय टाळला, ‘मला माहितच नाही.. छोटी गोष्ट आहे’

Raj Thackeray PC : देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कुठल्या विषयांवर चर्चा झाली असेल, यावर कुजबूज सुरु असतानाच राज ठाकरेंनी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी परत येत पत्रकार परिषद घेऊन या विषयावर भाष्य केले.

मुंबई : बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगला या शासकीय निवासस्थान जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्काला उधाण आले होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकरही त्यांच्यासोबत होते. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा रंगली. या भेटीत कुठल्या विषयांवर चर्चा झाली असेल, यावर कुजबूज सुरु असतानाच राज ठाकरेंनी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी परत येत पत्रकार परिषद घेऊन या विषयावर भाष्य केले. वाहतूक कोंडी या विषयावर चर्चा केल्याचं राज म्हणाले. तर पत्रपरिषदेच्या शेवटी बेस्ट पतपेढी निवडणुकांवरुन पत्रकारांनी छेडलं असता, राज ठाकरेंनी त्याला बगल दिली.

राज ठाकरे काय म्हणाले?

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या संदर्भात निकाल आले आहेत, असं पत्रकारांनी विचारलं असता, राज ठाकरे म्हणाले की, “हो मी वाचलं… काय आहे ते? मला माहितीच नाही हा विषय… निवडणुका स्थानिका आहेत.. पतपेढी का काय ना… ठीक आहे… छोट्या गोष्टी आहेत रे… तुम्हाला ना 24 तास काहीतरी दाखवायला हवं, याची आग लावा, त्याची आग लावा’ असं म्हणत राज ठाकरेंनी विषय टाळला.

वाहतूक कोंडीवरुन मुख्यमंत्र्यांशी भेट

राज ठाकरे पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला म्हणाले, की “गेले काही महिने मुख्यमंत्र्यांशी महत्त्वाच्या विषयांवर बोलत आहे. त्याचा आराखडा कसा करता येईल, हे पाहतोय. 2014 मध्ये अॅस्थेटिक्स विषयावर 16 मिनिटांची डॉक्युमेंट्री केली होती. टाऊन प्लॅनिंग हा माझा आवडीचा विषय आहे. स्कॉटिश साहित्यिकाचं छान वाक्य आहे, तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातात हे सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मला ते बदलावंसं वाटतं. तुमच्याकडील ट्राफिकची परिस्थिती दाखवा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर अशा शहरांमध्ये रिडेव्हलपमेंटची कामं सुरु आहेत” असं राज ठाकरे सांगत होते.

माणसं वाढत आहेत, ट्राफिक वाढला आहे, 400 इंच पावसात मुंबईत गोंधळ पाहिला. रस्ते कमी आहेत, ट्राफिकला शिस्त नाही, आपण कबुतर हत्तीवर अडकलोय, पण मूलभूत समस्यांकडे लक्ष नाही, इथे पार्किंग लॉट उभे करायला हवेत, या समस्यांवर तोडगा काढला नाही, तर कठीण आहे. याचा आराखडा मी मुख्यमंत्र्यांना दिला” असं राज ठाकरे म्हणाले. “रोज या शहरावर माणसं येऊन आदळत आहेत, रस्ते नाहीत, नुसत्या उंचच उंच इमारती बांधल्या जात आहेत, रस्ते बांधणं हा धंदा झालाय, वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणावी, नको तिथे भीती घालतात, अर्बन नक्षलवादापेक्षा याकडे लक्ष द्या, असंही राज ठाकरे यांनी सुनावलं.

बेस्ट पतपेढी निवडणुकीत झटका

दरम्यान, नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या उत्कर्ष पॅनेलला 21 पैकी एकाही जागेवर यश मिळालं नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात असलेल्या या निवडणुकीत सुपडा साफ झाल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. आधी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या साथीने मुंबईसह आगामी इतर महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केली होती, परंतु अशातच राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेल्याने चर्चांना तोंड फुटलं होतं.

याआधीही हिंदीसक्तीविरोधातील मोर्चाच्या तोंडावर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतल्यामुळे खळबळ उडाली होती. आताही मुंबईतील काही प्रश्नांवर राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गेल्याचं बोललं जात असलं, तरी आदल्याच दिवशी झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवाची किनार असल्यामुळे या ‘टायमिंग’ची चर्चा होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...
error: Content is protected !!