दिवा शहरातील करोडो रुपयांचा हफ्ता वसुली विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल….सौ अश्विनी अमोल केंद्रे
फेरीवाल्यांच्या कडून करोडो रुपयांचा हफ्ता वसूल करणारा दिवा स्टेशन ते दिवा आगासन रोड येथे रोहित ओझा आणि त्याचा आका कोण?मुंब्रा देवी कॉलनी येतील फेरीवाल्यांच्या कडून हफ्ता घेणारा, माँटी इतर सहकारी आणि त्याचा आका माणिक भगत यांच्यावर निवेदन,फोटो व्हिडिओ देऊनही कार्यवाही न झाल्याने कार्यवाही करण्यासाठी उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी अमोल केंद्रे यांनी याचिका दाखल केली आहे.
दिवा शहरात सामान्य जनतेला लुटण्याचे प्रकार सुरू आहेत.दिवा शहरात काहीही घ्या प्रत्येक वस्तू महाग असते. दूध,दही,कांदा,बटाटा,टमाटार नारळ,सर्व काही महाग मिळते.कारण हम करे सो कायदा लागू आहे.
दिवा शहरातील फेरीवाल्यांना हक्काचे मार्केट जागा उपलब्ध नाही.फेरीवाल्यांना जागा दिली हफ्ते कसे मिळणार.म्हणून फेरीवाल्यांना जागा मिळत नाही.फेरीवाल्यांना लायसन्स मिळत नाही.दिवा स्टेशन परिसरात तर चालण्यासाठीही जागा राहत नाही.या सर्व फेरीवाल्यांच्या कडून करोडो रुपयांची वसुली करणारे दिवा शहरात रॅकेट आहे.त्यांच्या विरोधात समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांनी तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.लवकरच यावर योग्य ती कार्यवाही न्यायालयाच्या मार्फत करण्यात येणार आहे.फेरीवाल्यांवर कार्यवाही करण्याचे दाखवायचे आणि त्यांच्या कडून हफ्ते घ्यायचे काही लोकांनी धंदे चालवले होते.फेरीवाल्यांच्या कडून करोडो रुपयांचे हफ्ते घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करून फेरीवाला उपजिविका कायद्याची अंमलबजावणी करून फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळवून देऊन जनतेसाठी रस्ते फेरीवाला मुक्त करण्यासाठी करोडो रुपयांचे हफ्ते वसुली विरोधात कडक कार्यवाही करण्यासाठी ॲड प्रभात दुबे न्यायालयात बाजू मांडणार असल्याचे समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांनी स्पष्ट केले.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















