*अखेर छत्रपती शिवाजी महाराज चौक नामकरण शिवभक्तांनी केलेच.हा विजय राजकीय पक्षांचा नाही तर शिवभक्तांचा आहे….समाजसेवक अमोल धनराज केंद्रे.*
*गेल्या कित्तेक वर्षा पासून दिवा टर्निंग येथील चौकस छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव देऊन शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी समस्त दिवेकरांची मागणी होती.समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी वेळो वेळी प्रशासनास निवेदन दिली.मोर्चा काढला १० जणांना अटक झाली,16 दिवस आमरण उपोषण केले.परत ३ दिवस आमरण उपोषण केले आणि दिवा चौकस छत्रपती शिवाजी महाराज चौक मंजूर करून घेतला.परंतु त्यावेळी सत्तेत असणारे आजी माजी आमदार नगरसेवक राजकीय पक्ष कोणीही पुढे आले नाही.परंतु महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्या समोर ठेवून आज राजकीय पक्षांनी स्टंट बाजी करून श्रेय घेण्यासाठी दिवा चौकास छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव देण्यासाठी शिवभक्तांना बोलवून आमच्या पक्षाने केले हे दाखवणे चुकीचे आहे. हे दाखवण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले असले तरी ज्या वेळी मोर्चा,काढला,आंदोलन केले,उपोषण केले त्यावेळी हे राजकीय पक्ष नेते आमदार,कुठे होते.त्यामुळे हा विजय दिवा शहरातील राजकीय पक्षांचा नसून दिवा शहरातील समस्त शिवभक्तांचा आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव देऊन शिवरायांचा अश्वरूढ पुतळा उभा राहण्यासाठी केसेस घेणाऱ्या,आंदोलन मोर्चा काढणाऱ्या समाजसेवक अमोल धनराज केंद्रे सौ अश्विनी अमोल केंद्रे व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लढणाऱ्या शिवभक्तांचा आहे. शिवभक्तांच्या लढ्याला आज यश मिळाले असले तरी ते यश अपूर्ण आहे.ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा उभा राहील आणि दिवा शहरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा राहील त्या दिवशी शिवभक्तांची भीम अनुयायांची जनतेची मागणी पूर्ण होईल.शेवटी निवडणुकी साठी श्रेय कोणीही घेतले तरी हरकत नाही.पण आज शिवभक्तांच्या लढ्याला यश मिळाले हे नक्की..समाजसेवक अमोल धनराज केंद्रे..*

मुख्य संपादक: संदीप जाधव




















