Homeताज्या बातम्यामुंबई येथे मराठा कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाला आहे.

मुंबई येथे मराठा कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाला आहे.

 मोठी बातमी! मराठा आंदोलनादरम्यान मुंबईत हृदयद्रावक घटना, पुन्हा एका मराठा आंदोलकाचा करुण अंत

Mumbai Maratha Reservation Protester Dies of Heart Attack : मुंबई येथे मराठा कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाला आहे. मयत तरुण लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील असल्याची माहिती समोर आली आहे. विजय घोगरे असं मृत तरुण कार्यकर्त्याचं नाव आहे.

राजधानी मुंबईतील आझाद मैदानात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचं आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केलीय. त्यासाठी, राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा बांधव मुंबईत पोहोचले असून काहीही झालं तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलीय. यादरम्यान, पुन्हा एका मराठा तरुण कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. मुंबई येथे आंदोलनात सहभागी असलेल्या विजय घोगरे या मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. हा तरुण लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, त्याला उपचारासाठी जे.जे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरने या कार्यकर्त्याला मृत घोषित केलं आहे.

मुंबईत पुन्हा एका मराठा कार्यकर्त्याचा मृत्यू

मुंबईत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आज पुन्हा एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील हा रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. आपल्या मराठा कार्यकर्त्याच्या निधनाने संपूर्ण आंदोलकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यापूर्वी जुन्नरजवळ एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असं त्या मृत व्यक्तीचं नाव असून, मनोज जरांगेंच्या मुंबईतील उपोषणाला सुरूवात होण्याआधीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकाराच्या शिष्ट मंडळांची त्यांच्याशी चर्चा सुरुय. न्या. संदीप शिंदेंनी त्यांच्याकडून थोडा वेळ मागितलाय, पण जरांगे ऐकायला तयार नाहीत. ते म्हणाले की, ‘मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मी हटणार नाही. आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी माघारी परतणार नाही. मराठवाड्यातील 1 लाख 23 हजार कुणबी गेले कुठे?’ असा सवालही जरांगेंनी केलाय. मराठवाड्यातील मराठा- कुणबी, असा अहवाल शिंदे समितीने द्यावा. ‘शिंदे समितीने 13 महिने अभ्यास केला. आता अहवाल द्यावा, आता एक मिनिटही देणार नाही, उद्या सकाळपर्यंत प्रमाणपत्र हातात द्या’, असं जरांगे यावेळी म्हणाले आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...
error: Content is protected !!