Homeक्राईमदिवा अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात;ठाणेमहानगरपालिका अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष – अ‍ॅड. रोहिदास मुंडे यांचा...

दिवा अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात;ठाणेमहानगरपालिका अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष – अ‍ॅड. रोहिदास मुंडे यांचा इशारा

दिवा अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात;ठाणेमहानगरपालिका अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष – अ‍ॅड. रोहिदास मुंडे यांचा इशारा

दिवा:- दिवा विभागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या व अस्तित्वात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अ‍ॅड. रोहिदास बामा मुंडे यांनी केला आहे.

निवडणूक काळात व त्याआधीही दिवा परिसरात अनेक अनधिकृत इमारती, मजले व बांधकामे उभी राहिली. यासंदर्भात अनेक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

यापूर्वी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खान कंपाऊंड परिसरातील 11 ते 15 अनधिकृत इमारती तोडण्यात आल्या, ही बाब सर्वश्रुत आहे. मात्र त्याच धर्तीवर दिवा विभागात कारवाई न होणे म्हणजे न्यायालयीन आदेशांचा आणि कायद्याचा अवमान असल्याचे मत अ‍ॅड. मुंडे यांनी व्यक्त केले.

अ‍ॅड. रोहिदास मुंडे हे गेली अनेक वर्षे दिवा विभागातील अनधिकृत बांधकामांविरोधात सातत्याने लढा देत असून, त्यांनी मागील महानगरपालिका आयुक्तांना तब्बल 110 अनधिकृत इमारतींचा छायाचित्रांसह अल्बम सादर केला होता, तरीसुद्धा आजतागायत त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असून, पाणी, ड्रेनेज, रस्ते, अग्निशमन यंत्रणा व इतर नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. यास सर्वस्वी प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या संदर्भात अ‍ॅड. रोहिदास मुंडे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत दिवा विभागातील सर्व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई सुरू करण्याची मागणी केली आहे.
जर येत्या काही दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयीन दाद घेतली जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

“कायद्याच्या राज्यात अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळणे दुर्दैवी आहे. दिव्यातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल,” असे ठाम मत अ‍ॅड. मुंडे यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह दिवा | प्रतिनिधी दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर...

कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन  कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे...

कोकण रेल्वे भरती प्रक्रियेवर महाराष्ट्रातून संताप १३२ जागांसाठी भरती; मुलाखती मात्र विशाखापट्टणम येथे — स्थानिक तरुणांवर अन्यायाचा आरोप मुंबई | प्रतिनिधी कोकण रेल्वे महामंडळाच्या (KRCL) १३२ विविध...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात राहुल शिंदे यांचा जाहीर प्रवेश दिवा प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे दिवंगत लोकनेते एकनाथ भगत यांच्या समाजाभिमुख...

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

दिव्यातील नालेसफाईवर मनसे आक्रमक; प्रशासनाच्या दाव्यांवर उपस्थित केले गंभीर प्रश्न दिवा | प्रतिनिधी पावसाळा तोंडावर असताना दिवा शहरातील नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप...
error: Content is protected !!