*टोरंट च्या मनमानी विरोधात…..अमोल धनराज केंद्रे*
दिवा शहरात राहणारी सामान्य जनता आहे.पंधरा ते वीस हजार पगार त्यात दोन वेळचे जेवण,मुलांचे शिक्षण घराचे हफ्ते यातच त्यांचा पगार संपून जातो.त्यात राजकीय नेत्यांच्या,पक्षांच्या आशीर्वादाने टोरंट पॉवर आणून जनतेचे कंबरडे मोडण्याचे काम राजकीय नेत्यांनी आणि टोरंट पॉवर ने केले आहे. टोरंट ला पहिलाच विरोध सर्वांनी केला असता तर आज ही वेळ जनतेवर आलीच नसती.परंतु जनतेचे काहीही झाले तरी आमचे पोट भरले पाहिजे यासाठी राजकीय पक्षांनी टोरंट आणली. काहींनी विरोध केला पण तो दिखावा होता.तू मारल्या सारखे कर मी रडल्या सारखे करतो.अशी एकता आहे राजकीय पक्षांची म्हणून टोरंट आली.त्यातच घरगुती अडचणी मुळे एक महिना जरी बिल भरले नाही तर टोरंट चे कर्मचारी काहीही विचार न करता घरी रहिवाशी असूनही त्यांना न विचारता लाईट कट करतात.घरच्यांना उर्मट पने बोलतात.त्यांना परत लाईट जोडण्यासाठी २१० रुपये द्यावे लागतात.आणि आता तर चक्क दीड रुपयाने युनिट महाग केल्याचे आज समजले.हा अन्याय सहन केला जाणार नाही.सामान्य जनतेला विश्वासात न घेता त्यांच्या मेहनतीच्या पैशावर असा घाला घालने तात्काळ थांबून सामान्य जनतेला सहकार्य करावे.
रहिवाशांचे ३ महिन्यांचे बिल थकीत असेल तर त्यानंतर लाईट कापण्यात यावी.बिल भरल्या नंतर लाईट जोडण्यासाठी कोणतेही शुल्क घेण्यात येवू नये तसेच सद्या जे दीड रुपये प्रति युनिट वाढ केली आहे.ती तत्काळ रद्द करण्याची मागणी धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे सचिव सौ अश्विनी अमोल केंद्रे यांच्या वतीने टोरंट पॉवर व्यवस्थापन कळवा,मुंब्रा,दिवा यांच्या कडे केली आहे.
याबाबत १५ दिवसात आपण निर्णय जाहीर करावा असे न केल्यास आपला कार्यालयाच्या समोर जनआंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी टोरंट पॉवर या कंपनीची आणि अधिकाऱ्यांची असेल.असे ठणकावून टोरंट प्रशासनाला सांगितले आहे.या प्रसंगी धडाकेबाज युवा प्रतिष्ठान चे सदस्य अनिल मौर्या,ऑल इंडिया पँथर सेना दिवा अध्यक्ष प्रफुल्ल तांबे,धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या रणरागिणी राधा तोरणे,सरला गायकर,रेणुका स्वप्नील कांबळे,अश्विनी संतोष माने,रंजना घोडेराव, लक्ष्मी खंडागळे,शीला बहिरुने,इतर नागरिक उपस्थिती होते.

मुख्य संपादक: संदीप जाधव




















